11 वी CET देणे का आवश्यक ? 11th CET necessary ?

 


इयत्ता दहावी नंतर सीईटी न देणार्‍या विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ...

 

नुकतीच महाराष्ट्र शासनाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी COMMON ENTRNCE TEST (सीईटी) जाहीर केली. सदर परीक्षा देणे किंवा न देणे हे विद्यार्थी  व पालकांवर सोपवले आहे.

जे विद्यार्थी सीईटी देणार नाहीत त्यांनी खालील महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करावा:

 = दहावीनंतरच्या एडमिशन साठी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल असा G.R. (गव्हर्मेंट रिझोल्युशन) मध्ये स्पष्ट उल्लेख आहे.

= याचा अर्थ असा कि इयत्ता अकरावी ऍडमिशन चे सर्व राऊंड संपल्यानंतरच सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळेल, म्हणजेच सगळ्यात शेवटी.

= इयत्ता अकरावी प्रवेशाचे तीन राऊंड होईपर्यंत कमीत- कमी ऑक्टोबर महिना उजाडलेला असेल. म्हणजे इतके दिवस विद्यार्थी फक्त घरातच नुसता(!) बसलेला असेल. त्यामुळे त्याचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

= अगोदर प्रवेशाची संधी मिळणारे (म्हणजे सीईटी देणारे) विद्यार्थी नामांकित, ग्रांटेड व गव्हर्मेंट कॉलेज मधील सीट्स घेऊन टाकतील. नंतर शिल्लक राहतील त्या फक्त नॉन-ग्रांटेड किंवा प्रायव्हेट कॉलेजमधील सीट्स,  ज्याची फी ग्रांटेड कॉलेज च्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त असते.

= नॉन-ग्रांटेड कॉलेजच्या परिस्थितीबद्दल बोलणे म्हणजे स्वतंत्र लेखाचा विषय होईल.

= याउलट जर विद्यार्थ्याने सीईटी दिली तर त्याचे किंवा पालकांचे कोणतेही नुकसान नाही; परीक्षा दिली तर फायदे मात्र बरेच आहेत, कारण गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थी काय शिकला त्याचे कोणतेही मूल्यमापन झालेले नाही.

= दीड वर्षापासून सर्व शिक्षण (?) ऑनलाइन होते व एकही परीक्षा झालेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया कच्चा राहिलेला असू शकतो, ज्याची खूप मोठी किंमत भविष्यात चुकवावी लागू शकते.

= म्हणून सर्व पालकांना आवाहन की आपल्या पाल्याला सीईटी जरूर द्यायला सांगा. त्यानिमित्ताने अभ्यासापासून दूर गेलेले विद्यार्थी कमीत- कमी काही दिवस तरी अभ्यास करतील व ते काय शिकले याचे मूल्यमापन परीक्षेच्या निकालात तुम्हाला कळेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.